केवळ काहीतरी रोज लिहायचं म्हणून लिहिणारे असे कितीक असतील आणि मनातलं कागदावर ओथंबून देण्यासाठी लिहिणारे किती असतील? नुसती उगाच आकडेमोड नकोच. हल्ली लोकांना फार लवकर राग येतो आणि तो लवकर व्यक्त सुद्धा होतो. तर्कावरून सुरु झालेला प्रवास तर्कशुद्ध विवेचनावरच थांबतो असं तर अजिबातच होत नाही. काल एका मराठी वृत्त वाहिनीवर हैदराबाद मध्ये कन्हैया कुमार वर चप्पल फेकली गेली त्यावर चर्चासत्र बघितलं. इतके खुजे लोक राजकारणात आहेत आणि असं विषारी राजकारण करतात हे बघून वाईट तर वाटलच पण आपल्या देशाच्या गौरवशाली परंपरेबद्दल ह्या लोकांच्या मनात किती भ्रामक समजुती आहेत, याचादेखील प्रत्यय आला. मुळातच विद्यार्थी चळवळ हि काही आज किंवा काल सुरु झालेली चळवळ नाही. तिला देखील काही इतिहास आहेच. आजच्या राजकारणात मुरलेली मंडळी जेव्हा इतका विखारी विद्यार्थी द्वेष व्यक्त करतात तेव्हा आश्चर्यापेक्षा त्यांची मला कीवच जास्त येते. एका विद्यार्थ्याने तुम्हाला एवढं जेरीस आणलं आहे कि त्याच्यावर तुम्ही आता चप्पल देखील फेकतात, त्याला जीवे मारायची धमकी देतात, हात पाय तोडणे यासारख्या फुटकळ घोषणा करतात आणि त्याला तु...
"Some of the sweetest things in life are through greatest struggling battles"