Skip to main content

जगण्याचा लढा

आज आमच्याकडे चार दिवस पाणी नसल्याकारणाने पाण्याची भीषण दाहकता प्रत्यक्षात फर्स्ट hand अनुभव करतोय. इतके दिवस मराठवाड्याला पाणी नाही, शेतकरी कुटुंबांची हतबलता फक्त पेपर मध्ये, बातम्यांमधून वाचत, ऐकत होतो. आज तीच परिस्थिती आम्हा शहरी भागात राहणाऱ्या लोकांवर आल्यामुळे खरं जगण्यातली विवशता आज आम्हाला कळतेय. आपण शहरी लोक फारच लाडावलेलो आहोत. जगण्याच्या सगळ्या सुविधा अक्षरश: लोटांगण घालतात आपल्यासमोर म्हणून अर्थातच आपल्याला किंमत नाही कसलीच. ह्याच जीवनोपयोगी गोष्टींसाठी जेव्हा जबर लढा द्यावा लागतो ना, तेव्हा त्यातली भयाण अस्वस्थता समोर येते.

आज पिण्यासाठी देखील पाणी नाही म्हणून जेव्हा दुकानातून काही लिटर्स मध्ये पाणी विकत आणायला लागलं तेव्हा अर्धा ग्लास पाणी पिऊन ते फेकून टाकणाऱ्या असंख्य लोकांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेले. आपण सगळेच बेफिकीरीने वागतो. किंबहुना आपल्या वागण्याचं समर्थन आपल्याला द्यावं लागत नाही एखाद्या एजन्सीला किंवा पर्यावरण watch संस्थेला म्हणून पण हा स्वभाव झाला. यात चुकीचं काहीच नाही हीच आपली मानसिकता. माझ्या थोड्याशा पाण्याच्या अपव्ययामुळे कुठे एवढा फरक पडतोय ना, हीच आपली विचार करायची तऱ्हा. निदान आतातरी, पाण्याचे युद्ध पेटण्याची चिन्हं दिसत असताना आपण काळजी घ्यायला सुरुवात करूयात. सण असला आणि तो वर्षातून एकदाच जरी साजरा होत असला तरी आपल्याच भविष्याचा विचार करून पाणी जपून वापरा, फटाक्यांवर नियंत्रण ठेवा, जेवढी जमेल तेवढी उर्जा वाचवा. आपल्याला अजून बरीच वर्ष ह्या ग्रहावर राहायचं आहे, निदान सामान्यांना तरी. पैसेवाले शोधतील हो नवीन ग्रहसृष्टी त्यांच्यासाठी!

Comments

Popular posts from this blog

या जन्मावर, या जगण्यावर...शतदा प्रेम करावे?

पुस्तकांच्या आणि निसर्गाच्या साथीत जेवढा वेळ छान जातो आणि सार्थकी लागल्यासारखा वाटतो तितका खचितच कुठेतरी अन्यत्र वाटतो. नवीन वर्षात केलेल्या संकल्पांपैकी एक म्हणजे वाचलेल्या प्रत्येक पुस्तकावर स्वतःचं विवेचन लिहिणं. सुरुवात तर झाली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आणि वर्ष अखेरीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या बऱ्याच बुक स्टोर्सनी भर भक्कम डिसकाउंट जाहीर केला होता. मी देखील नाही नाही म्हणता लोभाला भुलून पार ATM मध्ये जाऊन पैसे काढून पुस्तकं खरेदी केलीत वर्षाच्या शेवटच्या दिवशी. टिव्ही वरच्या असंख्य कार्यक्रमांवर नजर फिरवल्यास असं चित्र दिसतं कि समाजाच्या नैतिक मूल्यांशी कार्यक्रम बनवणाऱ्यांच काहीच घेणं-देणं दिसत नाही. माणसांची पतच एवढी रसातळाला गेली आहे कि कपोलकल्पित आणि वास्तव जग यांची चांगलीच सरमिसळ आपण करून ठेवली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचे आपले काहीच मनसुबे वाटत नाही. आज सकाळी विचार करता करता माझ्या असं लक्षात आलं कि आपण किती उगाच खलबतं करतो, आपला दुरान्वये संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल. काल रात्री जेवताना मी कुमार केतकरांचं "बदलते विश्व" हे साधारण दहा वर्षांपूर्व

गौरी देशपांडे आणि मी

आज २७ फेब्रुवारी. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा दिवस. त्यानिमित्त मला आवडणाऱ्या एका मराठी लेखिकेच्या पुस्तकाचं विवेचन इथे करते. गौरी देशपांडे- मराठी वाचणाऱ्या साऱ्याच वाचकांना हे नाव जितकं परिचित आहे तितकच फार जवळचं देखील आहे. मी सर्वप्रथम गौरी देशपांडे यांची एक कथा शाळेत असताना अभ्यासली होती- कलिंगड. आणि कित्येक दिवस मी त्या कथेच्या पुढे अजून काही असेल का म्हणून उत्सुक आणि अस्वस्थ होते. दहावीत असताना वाचली होती म्हणून त्यांचं सर्व लिखाण वाचून काढायचं हे ठरवलं. पुढची चार- पाच वर्ष त्यांचं असं काही वाचनात आलं नाही. नंतर 'आर्किटेक्चर' शिकताना कॉलेजच्या ग्रंथालयात मराठी पुस्तकांचं कपाट दिसलं. आणि पाहिलं पुस्तक जे मी घेतलं नी वाचलं ते गौरी देशपांडेंचं 'मुंबई-तळेगाव-ग्रीस' असा प्रवास करणारी 'मुक्काम' हि दीर्घ कथा/कादंबरी. त्याचं दुसरं पुस्तक वाचलं ते म्हणजे 'आहे हे असे आहे', आणि त्यात मला परत एकदा सापडली ती 'कलिंगड' हि कथा. मी चार-पाच वेळा ते पुस्तक वाचून काढलं परीक्षा सुरु होण्याच्या काही दिवस आधी, एप्रिल मधेच आणि त्या कलिंगडाची

आठवणीतल्या पाऊस गोष्टी!

गेल्या आठवड्यापासून पाऊस सगळीकडे चांगलाच पडतोय आणि हळूहळू पावसावरचे लेख देखील वाचण्यात येऊ लागलेत. मला फार पूर्वीपासूनच पावसात भिजणं आवडत नाही. कॉलेजच्या दिवसांत देखील ट्रेनने प्रवास करताना अनेकवेळा चिंब भिजून त्या गर्दीत चढताना जीव नकोसा व्हायचा. मला सर्दी लवकर होते म्हणून देखील मी पावसात भिजणं कटाक्षाने टाळते. तर आज हा इथे लिहिण्याचा उहापोह यासाठी की एका मैत्रिणीने तिच्या पावसाळी दिवसांच्या भुट्टा खाणाऱ्या आठवणी लिहिल्यात आणि त्या वाचून मी देखील काही क्षण त्या सुंदर गतकाळात स्थिरावले.  एके दिवशी पावसात चिंब भिजून कॉलेजला पोहोचले तर तिथे आमचा स्टुडिओच गळत होता. सगळीकडे फरशीवर पाणी आणि त्या अंधारलेल्या जागेत आम्ही मिळेल त्या कोरड्या जागेत बसलेलो मला आजही लक्ख आठवतंय.  नंतरच्या आठवणी ह्या जेजेतल्या हिरव्या पटांगणावर पडणाऱ्या पाऊसधारा बघण्याच्या आणि नाचत उड्या मारत पावसाला चकवत स्टुडिओ ते कॅन्टीनला पळण्याच्या ह्या होत्या.  इंटर्नशिपच्या काळात व्हीटी ते कुलाबा बहुतांशी मी पायीच प्रवास करायचे. तेव्हा छत्री सांभाळत, हातातलं पुस्तक भिजू न देता, इतर लोकांना चुकवत तो रस्ता चालताना देखील वेगळीच