Skip to main content

मध्य लटपटीत

आपण किती भूमिकांमधून वावरतो. आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनांमधून कितीतरी वेगळ्या जाणिवा देखील आपण अनुभवतो. मग गरज पडल्यावर सगळ्यांनाच एका चपखल नजरेतून का बघतो? फार पूर्वी घडलेल्या एखाद्या घटनेची चाचपणी वर्तमानकाळात करताना किती संदर्भ बदलेले असतात. आणि आपण त्यात पुरते गोंधळून जातो. उगाच किती तडजोड करावी एखाद्याने? मन हे दरवेळी झालेल्या घटनांचं स्पष्टीकरण देण्यात किती मग्न होऊन जातं. नवीन लोक, त्यांचे नवीन विचार, त्यांच्याशी जुळवून घेण्यात एखाद्याला येणाऱ्या अडचणी- अगणित गोष्टी. प्रत्येकाची सुरुवात एका बिंदूपासून. शून्यातून. क्वचित आपण अशा निरनिराळ्या स्वभाववैशिष्ठांच्या प्रेमातही पडतो. असूया निर्माण होते. सतत आभासी संवाद कानात पिंगा घालायला लागतात. मध्य असा आनंद मग आपल्याला निर्माण करावा लागतो, सगळ्यांच्या सुखासाठी.

खरंच सुख म्हणजे नक्की काय असतं? दडपशाहीच्या वातावरणात जगताना सुद्धा लोक आनंद साजरा करतात, दुःखात आसवं गाळतात. मग आपण असा समज का निर्माण करून घ्यावा कि भौतिक सुखाची व्याख्या हि सगळ्यांसाठी सारखीच आहे? गतवैभवाच्या अनंत स्मृतींमध्ये आपण अडकून पडलेलो आहोत आणि विशेष म्हणजे येणारा प्रत्येक क्षण हा नवीन निरलस स्मृती होणार हे माहित असून देखील आपण भूतकाळात वावरत राहतो. फार आडपडदा ठेवतो आपण स्वतःशीच. कधीतरी मिश्किल गमतीजमतीत मन रमवावे. कधी दुःखावेश देखील सोसावा आणि त्यातून उभारून नवी स्फूर्ती जगाला द्यावी. आपल्यासारखे असंख्य तरुण निराशेच्या गर्तेत किंवा आनंदाच्या डोहात समवेळी झुलत असतील. त्या क्षणाला पार करून नवे चैतन्य आपल्यालाच निर्माण करायचे आहे.

मी आणि माझ्या सभोवताली असणाऱ्या असंख्य चांगले आचरण करणाऱ्या व्यक्तींच्या सहवासातून खूपशा गोष्टी मला शिकायला मिळाल्या आहेत आणि त्याबद्दल त्यांची मी ऋणीच आहे. आपल्यातलं चांगलं दुसऱ्यांना देणं यासाठी देखील मोठे मन असावे लागते. कारण मोठेपणा उपजतच कोणाकडे अंगात नसतो. येणाऱ्या अनुभवांमधून आपण तो शिकत असतो. जसजसे आपण सुधारणावादी विचारसरणी अंगिकारितो, आपले विचार त्या भूमिकांपल्याड आपल्यात दिसू लागतात. केवळ ताठ बाणा किंवा भाषा रांगडी असून चालत नाही, तर ती सर्वसमावेशक असणे गरजेचे ठरते तसेच उदारमतवादी होणे हि काही एखाद्या अभ्यासक्रमात शिकावयाची व्याख्या राहिलेली नाही. जग बदललंय आणि आपण त्या बदलाचे नुसते स्वागत नाही तर आता त्या बदलाचे अग्रेसर सहभागी होऊन हा मध्य मोडून एक नवी वाट चालायला हवी. कारण म्हणतात ना, बदल हाच निसर्गाचा नियम आहे. 

Comments

Popular posts from this blog

या जन्मावर, या जगण्यावर...शतदा प्रेम करावे?

पुस्तकांच्या आणि निसर्गाच्या साथीत जेवढा वेळ छान जातो आणि सार्थकी लागल्यासारखा वाटतो तितका खचितच कुठेतरी अन्यत्र वाटतो. नवीन वर्षात केलेल्या संकल्पांपैकी एक म्हणजे वाचलेल्या प्रत्येक पुस्तकावर स्वतःचं विवेचन लिहिणं. सुरुवात तर झाली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आणि वर्ष अखेरीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या बऱ्याच बुक स्टोर्सनी भर भक्कम डिसकाउंट जाहीर केला होता. मी देखील नाही नाही म्हणता लोभाला भुलून पार ATM मध्ये जाऊन पैसे काढून पुस्तकं खरेदी केलीत वर्षाच्या शेवटच्या दिवशी. टिव्ही वरच्या असंख्य कार्यक्रमांवर नजर फिरवल्यास असं चित्र दिसतं कि समाजाच्या नैतिक मूल्यांशी कार्यक्रम बनवणाऱ्यांच काहीच घेणं-देणं दिसत नाही. माणसांची पतच एवढी रसातळाला गेली आहे कि कपोलकल्पित आणि वास्तव जग यांची चांगलीच सरमिसळ आपण करून ठेवली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचे आपले काहीच मनसुबे वाटत नाही. आज सकाळी विचार करता करता माझ्या असं लक्षात आलं कि आपण किती उगाच खलबतं करतो, आपला दुरान्वये संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल. काल रात्री जेवताना मी कुमार केतकरांचं "बदलते विश्व" हे साधारण दहा वर्षांपूर्व

गौरी देशपांडे आणि मी

आज २७ फेब्रुवारी. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा दिवस. त्यानिमित्त मला आवडणाऱ्या एका मराठी लेखिकेच्या पुस्तकाचं विवेचन इथे करते. गौरी देशपांडे- मराठी वाचणाऱ्या साऱ्याच वाचकांना हे नाव जितकं परिचित आहे तितकच फार जवळचं देखील आहे. मी सर्वप्रथम गौरी देशपांडे यांची एक कथा शाळेत असताना अभ्यासली होती- कलिंगड. आणि कित्येक दिवस मी त्या कथेच्या पुढे अजून काही असेल का म्हणून उत्सुक आणि अस्वस्थ होते. दहावीत असताना वाचली होती म्हणून त्यांचं सर्व लिखाण वाचून काढायचं हे ठरवलं. पुढची चार- पाच वर्ष त्यांचं असं काही वाचनात आलं नाही. नंतर 'आर्किटेक्चर' शिकताना कॉलेजच्या ग्रंथालयात मराठी पुस्तकांचं कपाट दिसलं. आणि पाहिलं पुस्तक जे मी घेतलं नी वाचलं ते गौरी देशपांडेंचं 'मुंबई-तळेगाव-ग्रीस' असा प्रवास करणारी 'मुक्काम' हि दीर्घ कथा/कादंबरी. त्याचं दुसरं पुस्तक वाचलं ते म्हणजे 'आहे हे असे आहे', आणि त्यात मला परत एकदा सापडली ती 'कलिंगड' हि कथा. मी चार-पाच वेळा ते पुस्तक वाचून काढलं परीक्षा सुरु होण्याच्या काही दिवस आधी, एप्रिल मधेच आणि त्या कलिंगडाची

आठवणीतल्या पाऊस गोष्टी!

गेल्या आठवड्यापासून पाऊस सगळीकडे चांगलाच पडतोय आणि हळूहळू पावसावरचे लेख देखील वाचण्यात येऊ लागलेत. मला फार पूर्वीपासूनच पावसात भिजणं आवडत नाही. कॉलेजच्या दिवसांत देखील ट्रेनने प्रवास करताना अनेकवेळा चिंब भिजून त्या गर्दीत चढताना जीव नकोसा व्हायचा. मला सर्दी लवकर होते म्हणून देखील मी पावसात भिजणं कटाक्षाने टाळते. तर आज हा इथे लिहिण्याचा उहापोह यासाठी की एका मैत्रिणीने तिच्या पावसाळी दिवसांच्या भुट्टा खाणाऱ्या आठवणी लिहिल्यात आणि त्या वाचून मी देखील काही क्षण त्या सुंदर गतकाळात स्थिरावले.  एके दिवशी पावसात चिंब भिजून कॉलेजला पोहोचले तर तिथे आमचा स्टुडिओच गळत होता. सगळीकडे फरशीवर पाणी आणि त्या अंधारलेल्या जागेत आम्ही मिळेल त्या कोरड्या जागेत बसलेलो मला आजही लक्ख आठवतंय.  नंतरच्या आठवणी ह्या जेजेतल्या हिरव्या पटांगणावर पडणाऱ्या पाऊसधारा बघण्याच्या आणि नाचत उड्या मारत पावसाला चकवत स्टुडिओ ते कॅन्टीनला पळण्याच्या ह्या होत्या.  इंटर्नशिपच्या काळात व्हीटी ते कुलाबा बहुतांशी मी पायीच प्रवास करायचे. तेव्हा छत्री सांभाळत, हातातलं पुस्तक भिजू न देता, इतर लोकांना चुकवत तो रस्ता चालताना देखील वेगळीच